◆ ‘स्वच्छ सर्वेक्षण 2017’ अंतर्गत
- स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग असलेल्या
भारतातील स्वच्छ आणि अस्वच्छ शहरांची नावे
जाहीर.
- स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग असलेल्या
‘स्वच्छ सर्वेक्षण 2017’ अंतर्गत
भारतातील स्वच्छ आणि अस्वच्छ शहरांची नावे
जाहीर.
- स्वच्छ शहराच्या यादीत मध्ये प्रदेशातील इंदूर पहिल्या क्रमांकावर असून अस्वच्छ शहराच्या यादीत उत्तर प्रदेशातील गोंड शहर प्रथम क्रमांकावर आहे .
- इंदूर नंतर सर्वात स्वच्छ शहर भोपाळ ठरले तर गेली २ वर्ष पहिल्या क्रमांकावर असलेले म्हैसूर पाचव्या क्रमांकावर गेले.
- यादीत महाराष्ट्रातील ४४ शहरांचा समावेश असून त्यापैकी Top-100 मध्ये फक्त ७ च शहरे.
- गुजरात मधील १२ शहरांचा TOP-50 स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत समावेश.
- अस्वच्छ शहरांच्या यादीत भुसावळ दुसऱ्या क्रमांकावर.
- Top-१० स्वच्छ शहरे
१. इंदूर – मध्य प्रदेश
२. भोपाळ – मध्य प्रदेश
३. विशाखापट्टणम – आंध्र प्रदेश
४. सुरत – गुजरात
५. म्हैसूर – कर्नाटक
६. तिरुचिरापल्ली – तामिळनाडू
७. नवी दिल्ली
८. नवी मुंबई – महाराष्ट्र
९. तिरूपती – आंध्र प्रदेश
१०.बडोदा – गुजरात
◆ प्राध्यापक विक्रम विशाल यांना 2017 चा आयएसए तरुण वैज्ञानिक पुरस्कार.
- भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील पृथ्वी विज्ञान विभागामधील सहाय्यक प्राध्यापक विक्रम विशाल यांना भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थे
मार्फत देण्यात येणारा प्रतिष्ठेचा तरुण
वैज्ञानिक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
- भारतातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनासाठी आयएनएसए ही संस्थेकडून हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.
- तरुण वैज्ञानिकांमधील सर्जनशीलता आणि उत्कृष्ठतेचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
- प्राध्यापक विक्रम विशाल कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करणे आणि नैसर्गिक वायूंच्या माध्यमातून पर्यावरणावरील त्याचा प्रभाव या विषया संबंधात काम करत आहेत.
◆ ब्रिटन मानवतावादी तज्ज्ञ मार्क लोकोक यांची
(सप्टेंबर 2017 पासून) मानवतावादी
कामकाज समन्वयासाठी UN कार्यालयाचे
प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- या अगोदर हा कार्यभार मानवतावादी कामकाज विभागाचे दुय्यम चिटणीस स्टीफन ओ’ब्रायन यांच्याकडे होता.
- UN मानवतावादी कार्यालय मुख्यतः आपत्ती, आपत्कालीन परिस्थिती आणि युद्ध अश्या परिस्थितीत मदत पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि नागरी सामाजिक भागीदारांसह मानवहितवादासंबंधी कार्य करते आणि समन्वयीत करते.
◆ प्राध्यापक शंख घोष यांना ५२ वा ज्ञानपीठ
पुरस्कार.
- साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते.
◆ आसाम मध्ये ब्रम्हपुत्रा नदीवर बांधण्यात
येणाऱ्या भारतातील सर्वात लांबीच्या “दौला
सादिया” पुलाचे उदघाटन २४ मे २०१७ ला
प्रधानमंत्र्याच्या हस्ते होणार.
- या पुलाद्वारे आसाम- अरुणाचलप्रदेश जोडले जाणार.
◆ 54 वे महाराष्ट्र राज्य चितपट पुरस्कार २०१७.
- सर्वोत्कृष्ठ पटकथा - दशक्रिया
- कासव चित्रपटाला सुवर्णकमळ.
- अभिनेत्री सायरा बानो, विक्रम गोखले, जॅकी श्रॉफ, अरूण नलावडे यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.
- विनोद तावडे यांच्याकडून मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी राज्य शासन विशेष प्रकल्प हाती घेणार असल्याची घोषणा.
◆ महावेध प्रकल्पाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील
डोंगरगाव येथे महाराष्ट्रातील पाहिले स्वयंचलित
हवामान केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
- या प्रकल्पासाठी Skymet Weathers Services PVT. Ltd. या कंपनीची प्रमुख सेवा पुरवठादार संस्था म्हणून निवड.
- महावेध प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे हवामान विषयक घटकाची Real Time माहितीची प्रत्यक १० मिनिटांनी डेटा लॉंगरमध्ये नोंद घ्यायची आहे.
◆ GSLV-F-09 च्या साहयाने ISRO द्वारा
“साउथ एशिया” या उपग्रहाचे प्रेक्षपण.
- या उपग्रहाद्वारे देशातील दुरसंचारात मदत होणार आहे.
◆ जेष्ठ दाक्षिणात्य निर्माते,दिग्दर्शक आणि
अभिनेते के. विश्वनाथ यांना ४८ वा दादासाहेब
फाळके पुरस्कार.
- हा पुरस्कार भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जातो.
- या पुरस्काराची सुरवात १९६९ मध्ये झाली.
- पहिला पुरस्कार देविका राणी या अभिनेत्रीला मिळाला.
Awesome notes. Thanks Vedh Spardhapariksha for making this website its very usefull.
ReplyDelete