चालू घडामोडी १४ मे २०१७



◆  ‘स्वच्छ सर्वेक्षण 2017’ अंतर्गत
     भारतातील स्वच्छ आणि अस्वच्छ शहरांची नावे
     जाहीर.

     -  स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग असलेल्या
      ‘स्वच्छ सर्वेक्षण 2017’ अंतर्गत
      भारतातील स्वच्छ आणि अस्वच्छ शहरांची नावे
      जाहीर.
  • स्वच्छ शहराच्या यादीत मध्ये प्रदेशातील इंदूर पहिल्या क्रमांकावर असून अस्वच्छ शहराच्या यादीत उत्तर प्रदेशातील गोंड शहर प्रथम क्रमांकावर आहे .
  • इंदूर नंतर सर्वात स्वच्छ शहर भोपाळ ठरले तर गेली २ वर्ष पहिल्या क्रमांकावर असलेले म्हैसूर पाचव्या क्रमांकावर गेले.
  • यादीत महाराष्ट्रातील ४४ शहरांचा समावेश असून त्यापैकी Top-100 मध्ये फक्त ७ च शहरे.
  • गुजरात मधील १२ शहरांचा TOP-50 स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत समावेश.
  • अस्वच्छ शहरांच्या यादीत भुसावळ दुसऱ्या क्रमांकावर.

  • Top-१० स्वच्छ शहरे
    १. इंदूर – मध्य प्रदेश
    २. भोपाळ – मध्य प्रदेश
    ३. विशाखापट्टणम – आंध्र प्रदेश
    ४. सुरत – गुजरात
    ५. म्हैसूर – कर्नाटक
    ६. तिरुचिरापल्ली – तामिळनाडू
    ७. नवी दिल्ली
    ८. नवी मुंबई – महाराष्ट्र
    ९. तिरूपती – आंध्र प्रदेश
    १०.बडोदा – गुजरात

◆ प्राध्यापक विक्रम विशाल यांना 2017 चा आयएसए तरुण वैज्ञानिक पुरस्कार.
  • भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील पृथ्वी विज्ञान विभागामधील सहाय्यक प्राध्यापक विक्रम विशाल यांना  भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थे
        मार्फत देण्यात येणारा प्रतिष्ठेचा तरुण  
        वैज्ञानिक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
  • भारतातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनासाठी आयएनएसए ही संस्थेकडून हा पुरस्कार दरवर्षी  देण्यात येतो.
  • तरुण वैज्ञानिकांमधील सर्जनशीलता आणि उत्कृष्ठतेचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
  • प्राध्यापक विक्रम विशाल  कार्बन डायऑक्साईडचे  उत्सर्जन कमी करणे आणि नैसर्गिक  वायूंच्या माध्यमातून पर्यावरणावरील त्याचा प्रभाव या विषया संबंधात काम करत आहेत.

◆ ब्रिटन मानवतावादी तज्ज्ञ मार्क लोकोक यांची  
  (सप्टेंबर 2017 पासून)  मानवतावादी  
  कामकाज समन्वयासाठी UN कार्यालयाचे
  प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • या अगोदर हा कार्यभार मानवतावादी कामकाज विभागाचे दुय्यम चिटणीस स्टीफन ओ’ब्रायन यांच्याकडे होता.
  • UN मानवतावादी कार्यालय मुख्यतः आपत्ती, आपत्कालीन परिस्थिती आणि युद्ध अश्या परिस्थितीत मदत पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि नागरी सामाजिक भागीदारांसह मानवहितवादासंबंधी कार्य करते आणि समन्वयीत करते.

◆ प्राध्यापक शंख घोष यांना ५२ वा ज्ञानपीठ
  पुरस्कार.
  • साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते.

◆ आसाम मध्ये ब्रम्हपुत्रा नदीवर बांधण्यात
  येणाऱ्या भारतातील सर्वात लांबीच्या “दौला
  सादिया” पुलाचे उदघाटन २४ मे २०१७ ला
  प्रधानमंत्र्याच्या हस्ते होणार.
  • या पुलाद्वारे आसाम- अरुणाचलप्रदेश जोडले जाणार.

◆ 54 वे महाराष्ट्र राज्य चितपट पुरस्कार २०१७.
  • सर्वोत्कृष्ठ पटकथा - दशक्रिया
  • कासव चित्रपटाला सुवर्णकमळ.
  • अभिनेत्री सायरा बानो,  विक्रम गोखले, जॅकी श्रॉफ, अरूण नलावडे यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.
  • विनोद तावडे यांच्याकडून मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी राज्य शासन विशेष प्रकल्प हाती घेणार असल्याची घोषणा.

महावेध प्रकल्पाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील  
  डोंगरगाव येथे महाराष्ट्रातील पाहिले स्वयंचलित
  हवामान केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
  • या प्रकल्पासाठी Skymet Weathers Services PVT. Ltd. या कंपनीची प्रमुख सेवा पुरवठादार संस्था म्हणून निवड.
  • महावेध प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे हवामान विषयक घटकाची Real Time माहितीची प्रत्यक १० मिनिटांनी डेटा लॉंगरमध्ये नोंद घ्यायची आहे.

◆ GSLV-F-09 च्या साहयाने ISRO द्वारा
  “साउथ एशिया” या उपग्रहाचे प्रेक्षपण.
  • या उपग्रहाद्वारे देशातील दुरसंचारात मदत होणार आहे.

◆ जेष्ठ दाक्षिणात्य निर्माते,दिग्दर्शक आणि
 अभिनेते के. विश्वनाथ यांना ४८ वा दादासाहेब  
 फाळके पुरस्कार.
  • हा पुरस्कार भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जातो.
  • या पुरस्काराची सुरवात १९६९ मध्ये झाली.
  • पहिला पुरस्कार देविका राणी या अभिनेत्रीला मिळाला.



Comments

  1. Awesome notes. Thanks Vedh Spardhapariksha for making this website its very usefull.

    ReplyDelete

Post a Comment