आधुनिक इतिहास :- राज्यसेवा अभ्यासक्रमां नुसार भाग १

ब्रिटिशकालीन समित्या व महत्वाचे कायदे :-




१) रेग्युलेटिंग ऍक्ट (१७७३) :-
● ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनव्येवस्थेत 
  सुसूत्रात आणण्यासाठी आणि त्या वर नियंत्रण
  ठेवण्यासाठी .
● बंगालचा गव्हर्नर बंगालचा गव्हर्नर जनरल
  बनला आणि त्याला मुंबई आणि मद्रास येथील
  गव्हर्नर वर देखरेख ठेवण्याचे अधिकार प्राप्त.
● कोलकात्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली.
● कंपनीच्या नोकरांना खाजगी व्यापारावर बंदी.


२) पीटचा कायदा (१७८४) :-
● भारतातील कंपनीच्या कारभारावर पार्लमेंटचे
  नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपीचे
  नियामक मंडळ स्थापन .
● सनदी कायद्याचे दर २० वर्षांनी नूतनीकरण
  करण्याची तरतूद .


३) १८१३ चा सनदी कायदा :
● कंपनीच्या भारतातील व्यापाराची मक्तेदारी
  नष्ट झाली.
● भारतीयांच्या शिक्षणासाठी एक लाख रु खर्च
  करण्याची तरतूद.


४) १८५३ चा सनदी कायदा :- 
● कायदे मंडळाची अधिकार कक्षा वाढवली .
● इंग्लंड मध्ये सनदी परिक्षा सुरु करण्यात 
  आली.


५) भारतीय शासन कायदा (१८५८) :-
● भरातमंत्री हे नवीन पद निर्माण करण्यात 
  आले.
● लंडन मध्ये १५ सभासदांचे "इंडिया 
  कौनसिल" स्थापन करण्यात आले .
● व्हॉईसरॉय व गव्हर्नर जनरल अशी दोन 
   अधिकार पदे निर्माण करण्यात आली .
● दोन्ही पदावर एकाच व्यक्तीची नेमणूक केली 
   जाणार .


६) १८६१ च्या कौन्सिल ऍक्ट द्वारे प्रथमच 
  भारतात कायदे मंडळ स्थापन करण्यात आले .


)१८९२ च्या कौन्सिल ऍक्ट द्वारे पाहिल्यानंदा
  अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व स्वीकारण्यात 
  आले .


८) मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा :-
● मोर्ले हे भरातमंत्री तर मिंटो हे गव्हर्नर जनरल
  होते .
● केंद्रीय कायदेमंडळातील सदस्यांची संख्या 
  १६ वरून ६० पर्यंत वाढवली .
● प्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व स्वीकारण्यात आले.
● मुस्लिमांनासाठी स्वतंत्र मतदार संघ जाहीर .


९) मॉंटेग्यू चे्म्सफोर्ड कायदे (१९१९)  :- 
● भारताला जबाबदार शासन पद्धती 
  क्रमाक्रमाने देण्याचे ब्रिटिशांचे उद्दिष्ट स्पष्ट .
● केंद्रीय विधिमंडळात " कौन्सिल ऑफ स्टेट"
  व  "लेजिसलेटिव्ही अस्सेम्बली " हे कनिष्ठ
   सभागृह निर्माण .
द्विदल राज्यपद्धती निर्माण.


१०) सायमन कमिशन (१८२७):- 
● एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता .
● भारतात संघराज्य स्थापन करावे व प्रांताला
  स्वायत्तता प्रदान करावी .


११) बॅ. जिनांची १४ कलमी  
  योजना(१९२९) :- 
● नवीन संघराज्याचे स्वरूप संघात्मक असावे.
● केंद्रीय विधिमंडळात मुस्लिमाना १/३ जागा 
  असाव्या.
● लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असावे.
● मुंबई पासून सिंध प्रांत वेगळा करावा.
● केंद्रीय व प्रांतीय मंत्रिमंडळात १/३ सभासद
  मुस्लिम असावेत .


१२) १९३५ चा भारतीय संघराज्याचा 
  कायदा :-
● केंद्रात संघराज्य स्थापन करावे.
● संघराज्यात सामील होण्यासाठी संस्थानावर 
  सक्ती नसावी .
● द्विदल शासन ऐवजी "प्रांतीय स्वायत्तता" 
  दिली.
● कायद्यानुसार १९३७ ला निवडणुका घेण्यात 
  आल्या.
● ब्रम्हदेश भारतापासून वेगळा करण्यात आला.


१३) क्रिप्स योजना (१९४२) :-
● १९४२ ला सर स्ट्रॅफोर्ड क्रिप्स भारतात .
योजनेतील तरतुदी -
- वसाहतीचे दर्जा असलेले संघराज्य निर्माण 
  करणे.
- घटना समितीने तयार केलेल्या घटनेस मान्यता
  देऊन ती लागू करणे .
- अल्पसंख्याकांना पूर्ण संरक्षणाची हमी.


१४) वेव्हेल योजना (१९४५) :- 
● व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीत सर्व सभासद
   भारतीय असतील व त्यात हिंदू आणि 
  मुस्लिमांची संख्या सामान असेल.
● परराष्ट्र खाते भारतीय सभासदकडे राहील.
● भारतात हायकमिशनर नेमण्यात येईल .


१५) कॅबिनेट मिशन प्लॅन :-
● ए.व्ही. अलेक्झांडर , स्ट्रॅफोर्ड क्रिप्स आणि 
  लॉर्ड लॉरेन्स यांच्या सदस्यते खाली कॅबिनेट
  मिशन ची स्थापना .
● लोकसंख्येच्या  प्रमाणात प्रतिनिधीत्व असावे.
● पाकिस्तान ची निर्मिती अमान्य .
● राज्यघटना बनवण्याचे भारतीयांना संपूर्ण 
  स्वतंत्र्य .


१६) माउंटबॅटन योजना :- 
● घटना समितीचे कामकाज चालू.
● पाकिस्तान साठी वेगळी राज्यघटना असेल .
● पंजाब व बंगाल असे दोन विभाग करावे .




Comments