आधुनिक भारताचा इतिहास भाग ३

स्वातंत्र्य चळवळी : भाग १

भारतचा इतिहास

कारणे  :-

भारताचे आर्थिक शोषण .

पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव - या शिक्षणातून 
  भारतीय तरुणांनी बुद्धिनिष्ठा, मानवता, समता,
  स्वतंत्र, लोकशाही, राष्ट्रवाद इ. मूल्य आत्मसात
  केली.


वृत्तपत्रे, नियतकालिके व साहित्य :-यातील
  देशाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय 
  परीस्थिती संबंधी लेखातून लोकजागृती झाली


• ब्रिटिशांची श्रेष्ठत्वाची भावना .
  इत्यादी कारणांनी स्वातंत्र्य चळवळीची   
  पायाभरणी केली .


• १८८३ ला सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 
  कोलकात्याला राष्ट्रीय परिषद भरवली .
- या अधिवेशनाला १०० प्रतिनिधी उपस्थित 
  होत.


• राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना - 
- मुंबईतील गोकुलदास तेजपाल संस्कृत शाळेत
  २८ डिसें १८८५ ला राष्ट्रीय सभेचे पहिले 
  अधिवेशन.
- अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते.
- ७२ प्रतिनिधी उपस्थित .


• बंगालची फाळणी व वंगभंग आंदोलन :-
- १९०५ ला लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी
  जाहीर केली.
- मुस्लिम बहुसंख्याक असलेला पूर्व बंगाल व
  हिंदू बहुसंख्याक असलेला पश्चिम बंगाल असे 
  विभाजन करण्याची योजना.
- १६ ऑक्ट. हा फाळणीचा दिवस " राष्ट्रीय
  शोकदिन" म्हणून पाळण्यात आला.
- एकतेचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम
  घेण्यात आला.
- परदेशी माल व शिक्षण यांवर बहिष्कार .
- १९०५ च्या अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी,
  बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हि चतुः सुत्री 
   स्वकरण्यात आली.
- १९११ ला लॉर्ड हार्डिंग्जद्वारा भारवलेल्या
  दिल्ली दरबारात पंचम जॉर्ज याने बंगालची
  फाळणी रद्द केली.
- १९०७ च्या सुरत अधिवेशनात राष्ट्रीय सभेत
  जहाल व मावळ गटात फूट पडली .
- १९१६ साली दोन्ही गट एकत्र आले तसेच 
  मुस्लिम लीग व राष्ट्रीय सभा एकत्र येऊन

  "लखनौ करार" अस्तित्वात आला

- करारा नुसार मुस्लिमांच्या विभक्त मातदार
  संघाना राष्ट्रीय सभेची मान्यता.


• मुस्लिम लीगची स्थापना :-
- "फोड व राज्य करा" या नितीखाली ब्रिटिशांनी
  हिंदू - मुस्लिम यांच्यात फूट पडण्यासाठी
  मुस्लिमांना स्वतंत्र राजकीय संघटना 
  काढण्यास चिथावले .
- आगाखान यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ
  लॉर्ड मिंटो यांना भेटले .
- १९०६ ला "मुस्लिम लीगची " स्थापना झाली.
- सलीमुल्ला खान मुस्लिम लीगचे संस्थापक
  व अध्यक्ष होते.
- मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष
  मुश्ताक हुसौन होते.


१९०९ चा मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा:
- कायदेमंडळातील भारतीय प्रतिनिधींची संख्या
   वाढवण्यात आली.
- काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश
  कायदेमंडळात करण्यात आला.
- मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण 
  करण्यात आले.


• होमेरुल चळवळ :- 
- डॉ.ऐनी बेझंट व बा.ग. टिळक यांनी 
  चळवळीची सुरुवात केली.
- या प्रकारची चळवळ आयर्लंड या देशात झाली
   होती .
• १९१७ ला " ब्रिटिश सरकार भारताला 
  टप्याटप्याने स्वशासनाचे अधिकार व जबाबदार
  राज्यपद्धती देईल" अशी घोषणा भारतमंत्री
  मॉन्टेग्गु यांनी केली.
• १९१९ ला भारतात घटनात्मक सुधारणा 
  घडवून आणण्यासाठी मॉंटेग्यु चेल्म्सफोर्ड 
  कायदा मंजूर.
- कायद्यान्वे प्रांतिक पातळीवर काही 
  बिनमहत्वाची खाती भारतीय मंत्र्यांकडे 
  सोपवण्यात आली.
- " हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही 

   नव्हे " या शब्दात लो. टिळकांनी या 

   कायद्यावर टीका केली.


• गांधी पर्व :- 
- १९१५ मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून 
  भारतात आले.
- १९१७ ला बिहारमधील चंपारण्यातील 
  शेतकऱ्यांसाठी सत्याग्रह.
- १८१८ मध्ये खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी
  साराबंदीची चळवळीचे नेतृत्व स्वीकारले.
- विनाचौकशी अटक करण्याची तरतूद 
  असलेल्या १९१९ च्या रौलेट कायद्याला 
  विरोध .


१३ एप्रिल १९१९ ला जलियनवाला बाग 

  हत्याकांड.

- बैसाखी सणाच्या निमित्ताने आयोजित 
  केलेल्या सभेवर जनरल डायरने गोळीबार 
  केला.
- हत्याकांडास पंजाबचा शासक मायकल 
  ओडियार जबाबदार.
- हत्याकांडाच्या निषेधात रवींद्रनाथ टागोर यांनी
  आपल्या "सर" ह्या पदवीचा त्याग केला.
- हत्याकांडाच्या चौकशीसाठी हंटर कमिशन
  नियुक्त.


• असहकार चळवळ (१९२०) :- 
- १९२० च्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने 
  असहकार चळवळीच्या ठरावाला मान्यता 
  दिली.
- चळवळीची सूत्रे गांधीजीकडे.
- देशात राष्ट्रीय शिक्षण देणारे शाळा- 
  महाविध्यालये स्थापन करण्यात आले.
- न्यायालायवर बहिष्कार टाकण्यात आला.
- १९२२ च्या चौरीचौरा येथील हिंसक घटने
  मुळे गांधीजींनी ही चळवळ स्थगिती दिली.


• स्वराज्य पक्ष :-
- १९२२ मध्ये मोतीलाल नेहरू व चित्तरंजन
  दास यांच्या द्वारा स्थापना .
- १९२३ च्या निवडणुकीत पक्षाचे अनेक 
  उमेदवार निवडून आले.


• १९२७ साली भारतीयांनी सुधारणा कायदा
  देण्यासाठी सायमन कमिशनची नियुक्ती 
  करण्यात आली.


• नेहरू रिपोर्ट :-
- भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार 
  करू शकत नाहीत अशी टीका भरातमंत्री
  बर्कनहेड याने केली.
- टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी मोतीलाल नेहरू
   यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समिती 
  स्थापन करण्यात आली व एक अहवाल तयार
  केला त्याला नेहरू अहवाल म्हणतात.
- वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे असा प्रस्ताव
  या अहवालात होता.



Comments