१) महात्मा फुले :-
- महात्मा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली पुण्यात झाला.
- फुलेंच्या मनावर जिस्टिस अँड ह्युम्यानिटी, कॉमनसेन्स, राईट्स ऑफ मॅन, एज ऑफ रिझन थॉमस पेन यांच्या या पुस्तकांचा प्रभाव होता.
- “The World is My Country, My Religion Is To Do Good’ हे थॉमस पेन यांचे वाक्य म. फुलेंच्या सामाजिक व धार्मिक सुधारणेसाठी प्रेरक ठरले.
- १८४८ ला त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा चालू केली व १८५२ ला दलितांसाठी शाळा चालू केली.
- हंटर कमिशन पुढे साक्ष देताना ‘प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी मागणी केली.
- १८८८ च्या राजदरबारात पारंपरिक शेतकरी वेषात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मडले.
- त्यांच्या राहत्या घरी त्यांनी बालहत्या प्रतिबंधगृहाची स्थापना केली.
- अस्पृश्याना पिण्यासाठी त्यांचा स्वतःचा पाण्याचा हौद खुला केला.
- १८७६ ते १८८२ या कालावधीत त्यांनी पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून काम पाहिले.
- बालविवाह, केशवपन, वर्णव्येवस्था , स्त्रीदास्य इ ला विरोध केला तर विधवापुनर्विवाह,स्त्रीशिक्षण, समता, इत्यादींचा पुरस्कार केला.
- त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या.
- १९ मे १८८८ मुंबईतील जनतेने त्यांचा सत्कार करून त्यांना महात्मा पदवी बहाल केली.
- शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ व ‘ गुलामगिरी ‘ या पुस्तकांत मांडली.
- २४ सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
◆ सत्यशोधक समाज :-
- ब्राह्मणाच्या सामाजिक व धार्मिक हक्कानं
आवाहन .
- परंपरा व अंधश्रद्धा यांना विरोध.
- सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी दीनबंधू हे
साप्ताहिक चालू झाले. १८८३ मध्ये ‘दीनबंधू’
ने ‘शेतकऱ्याचा आसूड’ हा ग्रंथ छापला.
- सामाजिक व धार्मिक गुलामगिरी नष्ट करण्याचा
प्रयत्न.
- १९११ ला कोल्हापूर मध्ये शाखा स्थापन झाली.
- पुढे राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक
समाजाचे कार्य पुढे नेले.
◆ सत्यशोधक समाजाची तत्वे :-
- सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत.
- ईश्वर एकाच आहे व तो निर्गुण आणि निराकार आहे.
- परमेश्वराची प्रार्थना करण्यास मधेस्थांची किंवा पुरोहिताची गरज नाही.
- ईश्वराची भक्ती आणि प्रार्थना करण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला आहे.
- कोणताही धर्मग्रंथ ईश्वरनिर्मित नाही . सर्व धर्म ग्रंथाची निर्मिती माणसानेच केली आहे.
● महात्मा फुलेंची ग्रंथसंपदा- गुलामगिरी,
सार्वजनिक सत्यधर्म, ब्राम्हणाचे कसब इ.
● महात्मा फुले यांचा मृत्यू २८ नोव्हें. १८९०
● महात्मा फुले यांचा मृत्यू २८ नोव्हें. १८९०
साली झाला.
२) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे :-
- वि. रा.शिंदे १८७३ ला कर्नाटक मधील जामखंडी या गावात झाला.
- बडोदा संस्थानात सयाजीराव गायकवाड यांची दिवाणपदाची नोकरी नाकारली.
- प्रार्थना समाजाच्या कार्यात मदत.
- अँम्स्टरडॅम् येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेत’ प्रतिनिधी म्हणून ‘हिंदुस्थानचा उदार धर्म ‘ हा निबंध सादर केला.
- ऑक्टोबर १९०६ ला मुंबईत त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. याचे अध्यक्ष न्या.चंदावरकर होते.
- १९१२ ला पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मध्ये अस्पृश्य व ब्राम्हण यांचा सहभोजनाचा कर्यक्रम घेतला.
- गरिबांना नोकऱ्या मिळवून देणे, त्त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणे या हेतूने त्यांनी “भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळाची” स्थापना केली.
- होळकरांच्या मदतीने त्यानीं अस्पृशांसाठी पुण्यात अहिल्याश्रमाची स्थापन केली.
- त्यांनी १९१८ मध्ये सयाजीराव गायकवाड यांच्या अधेक्षतेखाली मुंबईत ‘अस्पृश्यता निवारक परिषद’ घेतली.
- गांधीजींच्या अधेक्षतेखाली १९२० ला ‘अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद’ घेतली.
- कलकत्ता येथील ब्राम्हो मिशनिरी सभेत त्यांनी “मी बौद्ध आहे ‘ असे म्हंटले.
- १९४४ ला त्यांचा मृत्यू झाला.
३) म. धोंडो केशव कर्वे :-
- यांचा जन्म १८ एप्रि १८५८ ला रत्नागिरी जिल्ह्यात झाला.
- १८९३ ला वर्ध्यात विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. पुढे १८९४ ला याचा संस्थेचे नाव ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ ‘ असे करण्यात आले.
- १९०७ ला हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना केली.व १९१६ ला महिला विद्यापीठाची स्थापना करून नाथबाई दामोदर ठाकसी हे विठ्ठलदास ठाकसी यांच्या आईचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले.
- १८९६ ला पुण्यातील भिडे वाड्यात अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केली. विधवांना शिक्षण देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्या दुःखाचे निवारण करणे इत्यादी कामे या संस्थे मार्फत करणात येत.
- १९१५ ला महिला आश्रमाची स्थापना केली.
- १९०७ ला त्यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली. निष्कम बुद्धीने तन, मन, धन अर्पण करणारा संघ निर्माण करून त्याचा विस्तार करणे हे या संस्थेचा मुख्ये उद्देश होता.
- १८९३ गोदुबाई नावाच्या विधवेशी विवाह करून त्यांनी त्यांची कृती आचरणात आणली.
- १९३५ साली त्यांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली.
- १९५८ साली त्यांना भारत सरकारचा ‘भारतरत्न ‘ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
- ९ नोव्हें. १९६२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
४) राजर्षी छत्रपती शाहू महाराज :-
- शाहू महाराजांचा जन्म १८७४ ला झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे हे होते.
- महाहाराजांवर महात्मा फुले त्यांच्या विचारांचा प्रभाव होता.
- १८९९ च्या वेदोक्त प्रकरणानंतर मराठा समाजातील पुरोहित तयार करण्यासाठी त्यांनी १९२० ला श्री शिवाजी वैदिक विद्यालय चालू केले.
- १९०२ साली कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकऱ्यात ५०% जागा राखून ठेवल्या.
- १९१३ मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळेची सुरवात केली.
- महार वतने रद्द करून त्या जमिनी अस्पृश्याच्या नांवावर केल्या.
- १९०७ मध्ये त्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क नावाचे वसतिगृह चालू केले.
- मराठा विद्यार्थ्यांसाठी ‘व्हिक्टोरिया’ हे वसतिगृह चालू केले.
- १८९६ ला सर्व जातीजमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालू केले.
- १९११ ला सर्व अस्पृशांसाठी मोफत शिक्षण देण्याची तरतूद केली.
- १९२० मध्ये डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आलेल्या माणगाव येथील पहिल्या अस्पृश्याच्या परिषदेत ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
- १९२० ला अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद शाहू महाराजांच्या अध्यक्षतेत नागपूर येथे झाली .
- आरक्षणाचे जनक समजल्या जाणाऱ्या या सुधरकाचा मृत्यू ६ मे १९२२ ला झाला.
५) ५) डॉ.बी.आर.आंबेडकर :-
- यांचा जन्म १४ एप्रि. १८९१ ला मध्ये परदेशातील महू या गावी झाला.
- १९२० ला माणगाव येथे अप्पासाहेब पाटील यांच्या मदतीने भरलेल्या पहिल्या अस्पृश्य परिषदेचे अध्येक्ष होते.
◆ २० जुलै १९२४ ला बहिष्कृत हितकरणी
सभेची स्थापना झाली.
- या सभेची बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रसार करणे, त्यांची आर्थिक स्थती सुधारणे, समाजात जनजागृती करणे इ. प्रमुख उद्दिष्ट्ये होती. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हे या सभेचे ब्रीदवाक्य होते.
- १९२५ ला सोलापूर मध्ये या सभेने पहिले वसतिगृह चालू केले.
● १९२३ ला सी.के.बोले यांनी मुंबई
विधीमंडळात सार्वजनिक ठिकाणी
मुक्तसंचार असावा असा ठराव पास करून
घेतला .
● याच्या अंमलबजावणीसाठी महाड येथील
चवदार तळ्याचे पाणी पिऊन सत्याग्रह केला.
- १९२७ मनूस्मृती चे दहन केले.
- १९२९ ला पर्वतीमंदिर सत्याग्रह केला.
- १९३० रोजी नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्यात आलं व १९३४ ला हा सत्याग्रह मागे घेण्यात आला.
- १९३० च्या पहिल्या गोलमेज परिषदेत अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित.
- अस्पृशांसाठी स्वतंत्र मतदार संघाच्या तारतुदीवरून गांधी- आंबेडकर यांच्यात १९३२ ला पुणेकरार.
- १९४५ ला पीपल्स एज्युकेशन सोसिसटी ची स्थापना. या संस्थेमार्फत सिद्धार्थ कॉलेज सुरु.
- १९५० ला औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची स्थापना.
- १९१९ च्या लॉर्ड साऊथबेरो समितीपुढे अस्पृश्याच्या राजकीय हक्काची मागणी.
- १९३६ ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.
- १९४२ ला शेड्युलकास्ट फेडरेशनचीे स्थापना.
- त्यांची बंगाल विधीमांडळातून घटना समितीवर निवड झाली.
- घटना समितीतील मसुदा समितीचे अध्येक्ष म्हणून काम.
- “भारतीय घटनेचे शिल्पकार” म्हणून त्यांचा गौरव.
- त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘भारतरत्न’ या पुरस्काराने गौरविण्यात आले
- ६ डिसें.१९५६ ला त्यांचे निधन झाले.
Comments
Post a Comment