महाराष्ट्रातील संघटना :-
१) परमहंस सभा :-
- परमहंस सभा स्थापन होण्यापूर्वी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सुरत येथे “मानवधर्म सभा” स्थापन केली होती.
- दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी १८४९ ला परमहंस सभेची स्थापना केली.
- परमहंस सभेची मुख्ये उद्दिष्ठे :
- जातीसंथा नष्ट करणे.
- मूर्तिपूजा बंद करणे.
- दलित वर्गात शिक्षणाचा प्रसार.
- स्त्रीशिक्षणाला महत्व .
- सभेचे सदस्यत्व घेताना गुप्तता पाळण्यात येत असे व नाव गुप्त ठेवण्यात येत असे.
- नाव नोंदणी करताना जातपात न पाळण्याची शपथ देऊन ख्रिश्चनांच्या हातचा पावाचा तुकडा खायला देण्यात येत असे.
- दादोबांचा “परम हौसिक ब्रम्हधर्म” हा या सभेचा प्रमुख ग्रंथ होता.
- १८८० नंतर सभा बंद झाली.
२) ब्राम्हो समाजाचे महाराष्ट्रातील कार्य :-
- ब्राम्हो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी बंगाल मध्ये केली.
- १८६७ पासून न्या.रानडे व भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात या संस्थेचे कार्य चालू झाले व ब्राम्हो समाजापासून प्रेरणा घेऊन त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
३) प्रार्थना समाज :-
- १८६७ साली डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी बोलावलेल्या ‘समविचारी लोकांच्या सभेत’ चर्चेअंती ‘प्रार्थना समाजाची’ स्थापना झाली .
- प्रार्थना समाजाचे अध्यक्ष आत्माराम होते.
- रानडे याला ‘जुन्या भागवत धर्माची शाखा’ म्हणत.
- रानडेनीं प्रार्थना समाजासाठी “Love Of God, In The service Of Man” हे घोष वाक्य ठरिवले.
प्रार्थना समाजाची तत्वे :-
- समाजाची नैतिक प्रगती करणे.
- परमेश्वर एकाच असून तो सृष्टीकर्ता होय.
- प्रेम व ईश्वरावर श्रद्धा हीच खरी भक्ती.
- मुंबईत प्रार्थना समाजाची मंदिरे बांधली गेली.
- सातारा जिल्ह्यात महर्षी विठ्ठल रा. शिंदे यांनी प्रार्थना समाजाचे कार्य केले.
४) आर्य समाज :-
- स्वामी दयानंद सरस्वती यांनी १८७५ ला मुंबई येथे “आर्य समाजाची” स्थापन केली.
- आर्य समाजाची मूळ दहा तत्वे होती .
- परमेश्वर एक आहे . तो सर्वशक्तिमान, अनादी, अनंत, निराकार, सर्वसाक्षी व दयाळू आहे .
- तो सर्व ज्ञानी आदी उगम असून सर्व वस्तू परमेश्वराच्या स्वरूपात आहेत.
- त्याच्यावर श्रद्धा ठेवून प्रत्येकजण त्याचे सानिध्य मिळवू शकतो त्यासाठी मध्यस्थाची गरज नाही.
- सर्व ज्ञानाचे भांडार वेद आहेत.
- वेद ईश्वरप्रणित असून त्यांचे वाचन व श्रवण प्रत्येक आर्यांचे कर्तव्ये आहे.
- वेदांना प्रामाण्य मानून ‘वेदाकडे चला’ ही घोषणा.
- सत्याचा स्वीकार व असत्याचा त्याग करावा.
- नीतीने वागा, अनितीचा त्याग करा .
- अज्ञान नष्ट करून ज्ञानप्रसार करावा.
- प्रत्येकाने स्वार्थाला दुय्यम मानावे.
- आर्य समाजाने मूर्तीपूजेला विरोध केला व अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा यातील बुद्धीच्या कसोटीवर न पटणाऱ्या गोष्टी नाकारल्या.
५) थिऑसॉफिकल सोसायटी :-
- सोसायटीची स्थापना १८७५ ला न्यूयॉर्क मध्ये झाली.
- थिऑसॉफिकलचे संस्थापक मॅडम व्लव्हाटस्की व कर्नल ऑलकॉट १८७९ ला मुंबईत एक व्याख्यान दिले .
- १८७९ ला मुंबईत शाखा चालू झाली. या शाखेचे अध्यक्ष मालवणकर होते तर प्रमुख व्यवस्थापक लोकहितवादी हे होते.
- १८८२ ला मद्रास येथे अँनीं बेझंट यांनी शाखा स्थापन केली.
By : वेध स्पर्धापरिक्षचे
Comments
Post a Comment