★ राज्यपाल :-
- प्रत्येक घटकराज्यासाठी एका राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे होते.
- तो केंद्र व राज्यसरकार मधील दुवा असतो.
◆ पात्रता :-
- तो भारताचा नागरिक असावा.
- किमान वय ३५ वर्ष असावे.
- ती व्यक्ती संसद किंवा राज्यविधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाची सभासद असेल तर राज्यपालाचे पद ग्रहण केल्यावर ते सभासदत्व सोडावे लागेल.
- केंद्र किंवा राज्य सरकारच्या नोकरीत असू नये.
◆ कार्यकाळ :-
- सामान्यतः राज्यपाल पदाची मुदत पाच वर्षे असते पण खालील कारणामुळे ते मुदतपूर्व रिकामे होऊ शकते.
- राज्यपाल स्वतःहुन आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देऊ शकतात.
- राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहू शकतात, काही कारणांमुळे राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात.
- राज्यपालांच्या मृत्यू मुळे ते पद रिकामे होऊ शकते.
◆ नेमणूक :-
- राज्यपालांची नेमणूक प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतात.
- राज्यपालांच्या निवडीबाबत संकेत :-
- ती व्यक्ती त्या घटकराज्याची रहिवासी नसावी.
- राज्यपालांची नेमणूक करताना संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याचा सल्ला घेतला जातो.
- राज्यपाल पदासाठीची व्यक्ती निःपक्षपाती व राजकारणात क्रियाशील असलेली नसावी.
- राज्यपालाना पद्ग्रहणाची व गुप्ततेची शपथ संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधीश देतात.
★ अधिकार व कार्य :-
◆ प्रशासकीय अधिकार :-
- राज्यपाल घटकराज्याचा प्रमुख व केंद्रसरकारचा प्रतिनिधी अशी दुहेरी भूमिका बजावतो.
- राज्यातील मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, राज्य लोकसेवा आयोग यांच्या नेमणूका राज्यपाला द्वारे होतात.
- राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपालांचा सल्ला घेतात.
- घटकराज्यात विधानपरिषद अस्तित्वात असेल तर कला, शास्त्र इत्यादी क्षेत्रातील १/६ सभासदांची नेमणूक राज्यपाल करतात.
◆ कायदेमंडळ विषयक अधिकार :-
- राज्यपाल राज्याच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात.
- विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे, तहकूब करणे आणि विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार राज्यपालांना असतो.
- विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाहिल्या व वर्षातील पहिल्या अधिवेशना समोर राज्यपाल अभिभाषण करतात.
- विधानसभेत अँग्लो इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधीत्व नसल्यास अँग्लो इंडियन समाजाचा एका प्रतिनधीची नेमणूक राज्यपाल करतात.
◆ विधेयका बाबतीत निर्णय :-
- अर्थविधेयक वगळता इतर विधेयक जेव्हा राज्यपालांकडे मंजुरीसाठी येते तेव्हा राज्यपाल
- त्या विधेयकाला मंजुरी देतात.
- ते विधेयक राज्यविधिमंडाळकडे परत पाठवतात.
- राष्ट्रपतींकडे पाठवतात.
- विधिमंडळाकडे परत पाठवलेले विधेयक जर विधिमंडळाकडून परत मंजूर होऊन आले तर राज्यपालांना त्याला संमती द्यावीच लागते.
- राष्ट्रपतिकडे पाठवलेल्या विधेयकाबाबतीत- राष्ट्रपती त्या विधेयकाला मंजुरी देतात किंवा त्या विधेयका बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात किंवा ते विधेयक त्या घटकराज्याचा विधिमंडळाकडे परत पाठवतात.
◆ विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे
अधिवेशन चालू नसताना एखाद्या कायद्याची
गरज निर्माण झाल्यास राज्यपाल तसा वटहुकूम
काढू शकतात.
- राज्यविधिमंडळात अर्थविधेयक मांडताना राज्यपालांची पूर्वपरवानगी आवश्यक.
- दयेच्या किंवा माफीचा अर्जाचा विचार करून उच्च नायलायने दिलेली शिक्षा कमी करण्याचा किंवा माफ करण्याचा अधिकार राज्यपालांना.
- राज्याचा अर्थसंकल्प मांडताना राज्यपालांची पूर्वपरवानगी आवश्यक .
- राज्याचा संचित निधी राज्यपालांच्या नियंत्रणात असतो .
◆ स्वविवेकाधिकार :-
- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी अहवाल राष्ट्रपतींना पाठवतात.
- कोणत्याच पक्षाला बहुमत नमिळाल्यास मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचे ते राज्यपाल ठरवतात .
- अधिवेशन संपल्यानंतरच्या काळात जर सरकारने बहुमत गमावल्यास बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल अधिवेशनचा दिवस निश्चित करून अधिवेशन भरवतात .
- विधानसभा बरखास्त करणे.
- हे अधिकार राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याशिवाय वापरू शकतो.
- मागास प्रदेशांच्या विकासासाठी काही राज्यांमध्ये स्थापन केलेली वैधानिक विकास महामंडळे राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतात.
Comments
Post a Comment