- देशाच्या अर्थसंकल्पातील महत्वाचे अधोरेखित मुद्दे :- २०१७-१८
-गरिबी निर्मुलन आणि पायाभूत सुविधा विकास
या दोन क्षेत्रांवर यंदाच्या बजेटमध्ये भर.
१) कर:-अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या वर्गाकडून आता 10 ऐवजी 5
टक्केच प्राप्तिकर आकारण्यात येणार
- 50 लाख ते कोटी असलेल्यांच्या उत्पन्नावर
10 टक्के सरचार्ज लावण्यात येणार .
- राजकीय पक्षांना २ हजार पेक्षा जास्त निधी
रोखीत घेता येणार नाहीे चेक आणि डीजीटल
माध्यमातून निधी स्वीकारावा लागेल .
- 50 कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना
आयकरामध्ये 5 टक्के सवलत.
- रेल्वेच्या E-ticket आरक्षणावर सेवाकर
नाही लागणार.
२) गेल्या आर्थिक वर्षात भारतातील परदेशी
गुंतवणुकीत 36 टक्क्यांनी वाढ .
४) आयकराच्या महसुलात 17 टक्क्यांनी वाढ .
५) २.५ हजार कोटी डिजिटल घेवाण देवाण
लक्ष्य.
६) व्यापाऱ्यांसाठी कॅशबॅक योजना.
७) कर्जबुड्यांविरोधात स्वतंत्र कायदा करण्यात
येणार.
८) पोस्ट ऑफिस मुख्यालयातूनही पासपोर्ट
मिळणार.
- पोस्ट ऑफिसच्या सहकाऱ्याने डिजीटल
योजना लागू होणार.
९) परकीय गुंतवणूक महामंडळ रद्द.
१०) ग्रामपंचायती ब्रॉडबँडने जोडणार .
११) २०२५ पर्यंत भारताला टीबीमुक्त करणार.
१२) यूजीसीमध्ये सुधारणार करणार.
१३) ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट हेल्थ कार्ड देणार.
१४) गर्भवती महिलांच्या खात्यात ६ हजार रुपये
जमा केले जातील.
१५) १ मे २०१८ पर्यंत देशातील प्रत्येक गावात
वीज .
१६) पीक विमा आता ३० टक्क्याऐवजी ४०
टक्के.
Comments
Post a Comment