कामगार चळवळी :-
- २३ सप्टेंबर १८८४ ला ‘बॉम्बे मिल हॅण्डस असोसिएशन’ हि ही भारतातील पहिली कामगार संघटना नारायण मे. लोखंडे यांनी उभारली. नारायण मे. लोखंडे कामगार चळवळीचे जनक व महात्मा फुले यांचे महत्वाचे सहकारी म्हणून ओळखले जातात.
- यांच्या प्रयत्ना मुळे १८९० पासून कामगारांना रविवारची सुट्टी मिळू लागली.
- कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी १८८० मध्ये त्यांनी दीनबंधू या साप्ताहिकाची सुरुवात केली.
- ब्रिटिश सरकारकडून त्यांना रावबहादूर व जिस्टिस ऑफ पीस हा किताब देण्यात आला.
- प्लेगग्रस्थांच्या मदतीसाठी त्यांनी मुंबईत मराठा रुग्णालय चालू केले.
- १९२० ला लाला लजपतराय यांच्या अध्यक्षते खाली ‘आयटक’ ची स्थापन झाली.
- All India Tread Union Congress”
- संस्थेद्वारा ट्रेड युनियन रेकॉर्ड नावाचे पाक्षिक प्रसिद्ध केले जाते.
- आयटक सध्या कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न आहे. कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे हे आहेत.
- १९४७ ला इंटक( Indian National Tread Union Congress) ची स्थापना झाली.
- जॉर्ज फर्नांडिस ५०-६० च्या दशकातील कामगार चळवळीचे महत्वाचे नेते होते.
- १९७४ ला त्यांनी २० दिवसाचा रेल्वे संप घडवून आणला.
- त्यांनी समता पक्षाची स्थापना केली.
शेतकरी चळवळी :-
- १९६९ नंतर हरितक्रांती झाली. पण तंत्रज्ञानाचा वापर माहिती नसणारे गरीब शेतकरी हरितक्रांतीचे फायद्यापासून वंचित राहिले.
- १९६७ ला बंगाल मधील नक्षलबारी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलन चालू केले.
- महेंद्रसिंग टिकैत यांनी १९८६ ला भारतीय किसान युनियन ची स्थापना केली.
- धान्यांच्या वाहतुकीवरील नियंत्रणे काढून टाकावी, शेतकऱ्यानं कर्ज माफी द्यावी, शेतकऱ्यांना राज्यसरकार कडून पेन्शन द्यावी अशा मागण्या या संघटनेने केल्या.
- ही चळवळ प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, उ.प्रदेश या राज्यांन मध्ये सक्रिय होती.
- महाराष्ट्रात शरद जोशी १९७८ ला शेतकरी संघटनेची स्थापना केली.
- संघटनेच्या आंदोलनात प्रामुख्याने स्त्रियांचा सहभाग मोठ्याप्रमाणात होता.
- २००४ साली राजू शेट्टी यांनी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेची’ स्थापना केली ,उसाला कमाल भाव मिळावा हे या संघटने ची मुख्ये मागणी आहे.
३) आदिवासी चळवळी :-
- गोदावरी परुळेकर महाराष्ट्रातील आदिवासी चळवळीतील महत्वाच्या नेत्या आहेत.
- त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील वारली या आदिवासी लोकांच्या सामाजिक व आर्थिक उद्धारासाठी काम केले.
- आदिवासी चळवळीच्या प्रमुख मागण्या :-
- शासकीय नोकऱ्यात आरक्षण मिळवणे.
- वानांतील कामासाठी किमान वेतन मिळणे.
- वानांतील उत्पादने जमा करण्याचा व वनजमिनीवर लागवड करण्याचा हक्क मिळवणे.
- वेगळे राज्य किंवा वेगळा जिल्हा मिळवणे.
३) दलित चळवळी :-
- दलित समाजाचा दर्जा उंचावने व सामाजिक विषमता आणि हिंसा या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी दलित चळवळीची सुरुवात झाली.
- महाराष्ट्रातील दलितांच्या सामाजिक व आर्थिक समस्या सोडवण्यासाठी ‘रिपब्लिकन पक्षाची’ स्थापना झाली.
- १९७२ मध्ये राजा ढाले, ज. वि. पवार, नामदेव ढसाळ, बाबुराव बागुल, भाई संगारे,इत्यादींनी मिळून अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ या संघटनेतून प्रेरणा घेऊन ‘दलित पँथर’ या संघटनेची स्थापना केली.
- या चळवळीमुळे १९८९ ला दलित अत्याचाऱ्यांना कडक शिक्षा देणारा अट्रोसिटी ऍक्ट अस्तित्वात आला.
- १९८८ ला विविध राज्यातील दलित संघटना दलित फेडरेशनची निर्मिती करण्यासाठी एकत्र आल्या.
४) पर्यावरण विषयक चळवळी :-
- १९७९ च्या दशकात पर्यावरण ऱ्हास, प्रदूषण वाढ यांच्या मुळे होणाऱ्या परिणामाविषयी जागरूकता होण्यास सुरुवात झाली.
- पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काही स्वयंसेवी संस्थांनी आंदोलने चालू केली.
- चिपको आंदोलन :-
- १९७० ला उत्तराखंड मधील अलकनंदा या गावातुन सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्व खाली चिपको आंदोलन सुरू झाले.
- गावकरी झाडांना मिठी मारत व कंत्राटदारांना झाडे तोडण्यापासून परावृत्त करत.
- यापूर्वी अशा प्रकारचे आंदोलन राजस्थान येथील बिष्णोई समाजाने केले होते.
- शेतीच्या अवजारांसाठी ऐश जातीचे वृक्ष तोडणायची परवानगी नाकारून क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या उत्पादकांना प्रवनगी दिल्या मुळे या आंदोलनाची सुरुवात झाली.
- “परिसंस्था म्हणजे स्थायी अर्थव्येवस्था” हे या आंदोलनाचे घोषवाक्य होते.
- नर्मदा बचाव आंदोलन :-
- १९८० च्या दशकात मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात नर्मदा नदीवर बांधण्यात येणाऱ्या गुजरात मध्ये सरदार सरोवर व मध्ये प्रदेशात सागर प्रकल्पाना विरोध करण्यासाठी या आंदोलनाची सुरुवात झाली.
- या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळाला.
- आंदोलनाची फलनिष्पत्ती म्हणून २००३ ला शासनाने ‘राष्ट्रीय पुनर्वसन धोरण’ अवलंबले.
- १९७० च्या दुष्काळात विलासराव साळुंखे यांनी ‘पाणीपंचायात’ ही संकल्पना चालू केली.
Comments
Post a Comment